Jayant Patil : पुरवणी मागण्यांवरून जयंत पाटलांनी सरकारला धरले धारेवर, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळल्याचा आरोप
Jayant Patil : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो आहे असा आरोप त्यांनी केला आहे.