Nagpur : नागपूर मधील संचारबंदी पूर्णपणे उठवली

Nagpur : नागपूर मधील संचारबंदी पूर्णपणे उठवली

Nagpur

विशेष प्रतिनिधी

नागपूर: Nagpur  औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूर मध्ये हिंसाचार झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून लावण्यात आलेली संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. रविवारी दुपारी 3 वाजता संचारबंदी पूर्णपणे उठवल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. परंतु काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे.Nagpur

17 मार्चच्या रात्री दोन गटात हिंसाचार झाला होता. एक जणाचा मृत्यू झाला होता. 20 दुचाकी, 40 चारचाकीचे आणि 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. अनेकांची घरे जाळण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात 105 जणांना अटक करण्यात आली होती.

नागपूर शहरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. संचारबंदी लावल्याने हिंसाचार ग्रस्त भागात पोलीस बंदोबस्तामुळे वर्दळ थांबली होती. परंतु आता शहर पूर्वपदावर येत आहे. नागपुरात बाजारपेठही सुरु झाली आहे. वर्दळ सामान्य होऊ लागली आहे. नागपूर पोलिसांनी संचारबंदी उठवली असली तरी परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. महाल, गांधीबाग, इतवारी या भागात नागपूर शहरातील मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठ आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष आहे.

महिला राजकारणी एकमेकींविषयी असं कसं बोलू शकतात ? | BAKHARLive

Curfew in Nagpur completely lifted

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023