विशेष प्रतिनिधी
मुंबई : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि सक्रीय राजकारणातून दूर असलेले आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या तब्येतीबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी , “धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांचे डोळे वाकडे झाले असून त्यांना नीट बोलताही येत नाही,” असं सांगितल्याने ही चर्चा आणखी गडद झाली.मात्र या सगळ्यावर धनंजय मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
“माझ्या चेहऱ्यावर झालेल्या त्रासामुळे बोलण्यास अडचण होते, पण मला अर्धांगवायू नाही. मला दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सी झाला होता. याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर झाला असून सध्या मी उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठीही मुंबईत उपचार झाले होते,” असे मुंडे यांनी सांगितले.
बाबासाहेब पाटील यांच्याशी दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीचा उल्लेख करत त्यांच्या काळजीबद्दल आभार मानले. मात्र, “माझ्या आजाराबाबत चुकीची माहिती प्रसारित होऊ नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
धनंजय मुंडे यांचं नाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विधिमंडळ, सभा वा पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूरच राहिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळीही ते अनुपस्थित होते.
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
श्री…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 18, 2025
“I don’t have paralysis, I have Bell’s palsy”, Dhananjay Munde explains
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना