विशेष प्रतिनिधी
पुणे: HSC results महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीचा निकाल आज जाहीर केला असून यंदाही विद्यार्थिनींनीच सरस कामगिरी करत बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. कोकण विभागाने 94.14 टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून लातूर विभाग 84.14 टक्क्यांसह शेवटच्या स्थानावर राहिला आहे.HSC results
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय शाखांसाठी एकूण 14,44,713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.HSC results
खाजगी विद्यार्थ्यांमध्ये 37,559 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 36,941 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल 80.21 टक्के आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 50,876 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाची उत्तीर्णता 36.44 टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 8,446 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 8,367 विद्यार्थी परीक्षेस बसले आणि 7,579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची उत्तीर्णता 90.58 टक्के इतकी आहे.
यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 93.15 टक्के तर मुलांचा निकाल 86.80 टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी जास्त आहे.
एकूण 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, ही देखील विशेष बाब आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी आसन क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे. वेबसाइटवर ताण वाढल्यास काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Girls outshine boys as Konkan tops Maharashtra HSC results, overall pass rate at 89.79
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन